Saturday, November 10, 2012

महात्मा जोतिबा फुले

Mahatma Jotiba Phule

महात्मा  जोतिबा फुले 

  • Birth Date - 11 April 1827
  • Birth Place - Vanavadi (pune)
  • Village - Katgun (Satara)
  • Original Surname - Gorhe
  • Death  - 28 September 1890
* गोर्हे कुटुंबीय फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव बदलून फुले असे ठेवण्यात आले.
* लहूजी साळवे यांचेकडून दांडपट्टा, नेमबाजी इत्यादीचे शिक्षण घेतले.
* १८४० सावित्रीबाईंशी विवाह केला
* १८४७ सदाशिव गोवंडे या ब्राम्हण मित्राच्या लग्न वरातीत झालेल्या अपमानापासून सामाजोद्धाराचा वसा घेतला.
 शैक्षणिक कार्ये 
पहिली शाळा  -  ३ ऑगस्ट १८४८- पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.
दुसरी शाळा   -  ४ मार्च १८५१- पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी दुसरी शाळा सुरु केली
तिसरी शाळा  - १८५२ साली पुण्यातील रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
चौथी शाळा    -  १८५२ साली वेताळ पेठेत मुलींसाठी चौथी शाळा सुरु केली.

१८५२ साली अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण देणारी शाळा सुरु केली.
 - या त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल मे. कण्डी यांच्या हस्ते विश्रामबाग येथे १८५२ साली सत्कार करण्यात आला.
१८५३ - मंडळी नावाची संस्था काढली. हि संस्था महार मांग  समाजातील लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करत होती
१८५४ - स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली
१८५५ - प्रौढांसाठी रात्र शाळा सुरु केल्या, तृतीयरत्न हे नाटक लिहिले (शूद्रांच्या दयनीय स्थितीचे दर्शन घडविणारे नाटक)
१८५६ - म. फुलेंवर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला.
१८६३ - 'बालहत्या प्रतिबंधकगृहा'ची स्थापना केली
१८६४ - गोखले बाग येथे पहिला पुनर्विवाह घडवून आणला
१८६५ - 'विधवा केशवपन प्रथे'च्या विरोधात तळेगाव येथे नाभिकांचा संप घडवून आणला



डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

Dr. Babasaheb alias Bhimrav Ramji Ambedkar 

 डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

 

Dr. Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar
Birth Date - 14 April 1891
Birth Place - Mahu  (Madhya Pradesh)
Original Surname - Ambavade (Ratnagiri)
Death  - 6 December 1956
समाधी - चैत्यभूमी, दादर (मुंबई)


प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले
माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले

महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले

घटनाक्रम -

* १९०६ - रमाबाईशी लग्न झाले
* १९०७ - मेट्रिक परीक्षा पास
* १९१३ -प्राचीन भारतातील व्यापार (Ancient India Commerce) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची   M.A. डिग्री संपादन केली. यासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - भारताचा राष्ट्रीय नफ्यातील वाटा (National Dividend of India) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची पी. एच.डी.  मिळवली. यावेळी सयाजीराव गायकवाड यांचेच आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - Cast in India - हा ग्रंथ लिहिला.
* १९१८-१९२० - मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक होते.
* १९२० - ३१ जाने. रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरु केले.
* १९२०  - शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळाने इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले.
* १९२० - माणगावच्या अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले
* १९२३ - "पैशाचा यक्षप्रश्न" हा शोध प्रबंध लिहून  Bar At Law ची पदवी मिळविली (लंडन)
* १९२४ - २० जुलै रोजी "बहिष्कृत हितकारिणी सभा" स्थापन केली.
* १९२६ - मुंबई कायदे मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक (१९२६-१९३६)
* १९२७ - ३ एप्रिल रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले. याच वर्षी 'समता' हे वृत्तपत्र सुरु केले.
* १९२७ - २० मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. (१९३७ साली हे तळे सर्वांसाठी खुले करण्यात आले )
* १९२७ - २५ डिसेंबर रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
* १९२७ - महाड येथे अस्पृश्य परिषद भरवली
* १९२७ - 'समता समाज संघा'ची स्थापना केली
* १९२८ - सायमन कमिशनसमोर साक्ष
* १९३० -  नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह घडवून आणला. १९३५ साली हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले.
* १९३० ते १९३३ दरम्यानच्या तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृशांचे नेतृत्व
* १९३२ - २४ सप्टेम्बर रोजी म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला यालाच येरवडा करार असेही म्हणतात.
* १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
* १९३६ - 'स्वतंत्र मजूर पक्षा' ची स्थापना केली.(१९३७ च्या प्रांतिक निवडणुकीत या पक्षाने १५ जागा जिंकल्या.)
* १९४२ - आप्पा दुराई यांच्या मदतीने नागपुर येथे 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली.
* १९४६ - मुंबई येथे 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' आणि 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' ची स्थापना केली
            - 'मिलिंद महाविद्यालय' औरंगाबाद येथे सुरु केले
* १९४७ - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. २९ ऑगस्टला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
* १९४८ - डॉ. शारदा कबीर उर्फ माई यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे विवाह झाला.
             - हिंदू कोड बील संसदेत मांडले पण विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
* १९५६ - दिनांक १४ ऑक्टोबर रोजी नागपूर (दीक्षाभूमी) येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
* ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले
* बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे आहे. 

इतर महत्वाचे-
बाबासाहेबांच्या प्रिंटींग प्रेस चे नाव 'भारत प्रिंटींग प्रेस' होते.
'रानडे, गांधी आणि जीना'  हे पुस्तक त्यांनी लिहिले.
नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली (स्थापना - १९५८-  एन शिवराज) 
१९९१ - साली भारत सरकारचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार - (१९९१ हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आले)
"शिका, संघटीत व्हा आणि लढा" हा संदेश तरुणांना दिला.
************************************************************************

ठळक अक्षरातील माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

Rajarshi Chatrapati Shahu Maharaj

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज 


Rajarshi Shahu Maharaj

Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur)
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)

* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च  1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब  यांच्याशी विवाह झाला

 महाराजांचे शिक्षण - *1885 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.


* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे  उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला. 
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
 -शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
 -कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
 -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले

* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
      - सहकारी कायदा केला व  सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
      -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
      -कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
      -बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
      -आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय  विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
      - जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
      - आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
      - गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
      -  तलाठी शाळा सुरु केल्या.
 * 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
      - एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या  
        अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
      - शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
 * 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
       - देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
       - हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
       - पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
 *  6 मे  1922 रोजी मुंबई येथे निधन.

 
*********************************************************************************


Some Important Questions on Shahu Maharaj:

1. Shahu Maharaj Born On ____, in _____?
A. Jun 26, 1974, kolhapur
B. June 24, 1976, Kagal
C. July 24, 1974, Kanpur
D. July 26, 1976, Mumbai

2. Shahu Maharaj Started "Victoria Maratha Bording" in ______
A. Nashik
B. Kagal
C. Mumabi
D.Kolhapur

3. When Shahu Maharaj Started Branch of "satyashodhak samaj" in kolhapur?
A. 12 February, 1912
B.  03 March, 1920
C.  24 September, 1906
D. 11 January 1911