Saturday, November 10, 2012

डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

Dr. Babasaheb alias Bhimrav Ramji Ambedkar 

 डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

 

Dr. Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar
Birth Date - 14 April 1891
Birth Place - Mahu  (Madhya Pradesh)
Original Surname - Ambavade (Ratnagiri)
Death  - 6 December 1956
समाधी - चैत्यभूमी, दादर (मुंबई)


प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले
माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले

महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले

घटनाक्रम -

* १९०६ - रमाबाईशी लग्न झाले
* १९०७ - मेट्रिक परीक्षा पास
* १९१३ -प्राचीन भारतातील व्यापार (Ancient India Commerce) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची   M.A. डिग्री संपादन केली. यासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - भारताचा राष्ट्रीय नफ्यातील वाटा (National Dividend of India) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची पी. एच.डी.  मिळवली. यावेळी सयाजीराव गायकवाड यांचेच आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - Cast in India - हा ग्रंथ लिहिला.
* १९१८-१९२० - मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक होते.
* १९२० - ३१ जाने. रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरु केले.
* १९२०  - शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळाने इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले.
* १९२० - माणगावच्या अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले
* १९२३ - "पैशाचा यक्षप्रश्न" हा शोध प्रबंध लिहून  Bar At Law ची पदवी मिळविली (लंडन)
* १९२४ - २० जुलै रोजी "बहिष्कृत हितकारिणी सभा" स्थापन केली.
* १९२६ - मुंबई कायदे मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक (१९२६-१९३६)
* १९२७ - ३ एप्रिल रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले. याच वर्षी 'समता' हे वृत्तपत्र सुरु केले.
* १९२७ - २० मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. (१९३७ साली हे तळे सर्वांसाठी खुले करण्यात आले )
* १९२७ - २५ डिसेंबर रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
* १९२७ - महाड येथे अस्पृश्य परिषद भरवली
* १९२७ - 'समता समाज संघा'ची स्थापना केली
* १९२८ - सायमन कमिशनसमोर साक्ष
* १९३० -  नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह घडवून आणला. १९३५ साली हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले.
* १९३० ते १९३३ दरम्यानच्या तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृशांचे नेतृत्व
* १९३२ - २४ सप्टेम्बर रोजी म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला यालाच येरवडा करार असेही म्हणतात.
* १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
* १९३६ - 'स्वतंत्र मजूर पक्षा' ची स्थापना केली.(१९३७ च्या प्रांतिक निवडणुकीत या पक्षाने १५ जागा जिंकल्या.)
* १९४२ - आप्पा दुराई यांच्या मदतीने नागपुर येथे 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली.
* १९४६ - मुंबई येथे 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' आणि 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' ची स्थापना केली
            - 'मिलिंद महाविद्यालय' औरंगाबाद येथे सुरु केले
* १९४७ - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. २९ ऑगस्टला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
* १९४८ - डॉ. शारदा कबीर उर्फ माई यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे विवाह झाला.
             - हिंदू कोड बील संसदेत मांडले पण विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
* १९५६ - दिनांक १४ ऑक्टोबर रोजी नागपूर (दीक्षाभूमी) येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
* ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले
* बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे आहे. 

इतर महत्वाचे-
बाबासाहेबांच्या प्रिंटींग प्रेस चे नाव 'भारत प्रिंटींग प्रेस' होते.
'रानडे, गांधी आणि जीना'  हे पुस्तक त्यांनी लिहिले.
नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली (स्थापना - १९५८-  एन शिवराज) 
१९९१ - साली भारत सरकारचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार - (१९९१ हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आले)
"शिका, संघटीत व्हा आणि लढा" हा संदेश तरुणांना दिला.
************************************************************************

ठळक अक्षरातील माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे.

1 comments:

  1. बाबासाहेबाच्या बदल योग्य माहिती वाचायला मिळाली

    ReplyDelete